मारेगाव:छत्रपती शिवाजी महाराजानंतर आदर्श राज्यकारभार सांभाळणारी कुशल प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर होय.अहिल्यादेवी ने राज्यकारभार चालवताना चरित्र जोपासले, महिलांची पहिली फौज निर्माण करणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी तसेच स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचे कार्य अहिल्यादेवी होळकर ने केले.छञपती शिवाजी महाराजानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणारी प्रशासक म्हणजे अहिल्यादेवी होळकर असे प्रतिपादन जाहीर समाज प्रबोधन मेळाव्यात श्री विकास चिडे यांनी केले. काल दिनांक 31 मे 20234 रोज शुक्रवार ला बोरी गदाजी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.संजय लव्हाळे सर होते तर उदघाटक म्हणून श्री संजयभाऊ देरकर उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री गजानन तुराळे, काशिनाथ पचकटे, हुसेन करडे, प्रदीप साबरे, वसंतराव बच्चे, बंडू डाहूले, अनिल बोबडे, अमर पिंपळकर, श्री पेंदाम सर, सौ मंगला करडे, गंगा करडे, अनिता राजूरकर, छाया राऊत, चंद्रकला गेडाम, शांताबाई निखाडे मंचावर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त समाजातील जेष्ठ व्यक्तींचा यावेळी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रविण्यासह उत्तीर्ण झालेल्या देवांश साबरे आणि प्रणय करडे या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री आशिष साबरे यांनी केले तर प्रस्तावना श्री गजानन तुराळे सर यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाजबांधवांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली.