हजारो कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांनी दाखल केला नामांकन अर्ज, रॅलीच्या माध्यमातुन महाविकास आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन.
वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...
Reg No. MH-36-0010493
✍️मुनिश्वर बोरकर
गडचिरोली
नागपूर दि. २५ :- राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत पिके करपायला लागली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पेरणी झालेली नाही. अशा परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकर्यांच्या मानगुटीवर बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा असल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला.
महायुती सरकारने नोटिसा मागे घ्याव्यात अन्यथा काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. या नोटिसांना घाबरून न जाता त्या आपल्याकडे पाठवून देण्याचे आवाहन वडेट्टीवार यांनी करुन वडेट्टीवार यांनी शेतकर्यांना दिलासा दिला. बँकांच्या नोटिसांना स्थगिती देऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
राज्यात जून,लजुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे ६८ टक्क्यांनी पाऊस कमी आहे. दिनांक १ ते १८ ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ८० टक्क्यांनी कमी आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या केवळ ४२ टक्के, मराठवाड्यात २८ टक्के, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात केवळ ३६ टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील १५ जिल्ह्यांत पावसाच्या सरासरीतली तूट मोठी आहे. ही विदारक परिस्थिती पाहता शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. पिके
हातातून गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज भरण्यासाठी नोटिसा पाठवण्यात येत आहेत. यावरुन
शेतकरी, शेतमजूर यांच्यप्रति शिंदे- फडणवीस-पवार-(अजित) सरकार बोथट झाले असून ते सरकार भावनाशून्य झाले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.
लाखो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळालेले नाही. पीकविमा कंपन्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खतांचा काळाबाजार, बियाणांची टंचाई, बोगस बियाणे आणि खतांचा सुळसुळाट असतानाही शेतकर्यांनी प्रतिकूल परिस्थितीत
पैसे उभे करुन पिके घेण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला कमी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे कृषीमंत्री बीडच्या सभेत व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री सूटबुट घालून जपानला गेले आहेत आणि मुख्यमंत्री काहीच बोलत नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना वाली कोण? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा येत आहेत. दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकार त्यांना एवढा जाच का देत आहे? असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. अजित पवार आजपर्यंत नोटिसा आल्यानंतर भूमिका मांडत होते तेही आता गप्प बसले आहेत. या झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागं करुन रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांचा आक्रोश काय असतो, हे दाखवून देण्याचा निर्धारही वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांनी बँकेकडून येणाऱ्या नोटिसांना घाबरून न जाता त्या आपल्याकडे पाठवून द्या असे आवाहन करुन शेतकर्यांच्या पाठीशी उभे खंबीरपणे राहण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
वणी:- वणी विधानसभेची उमेदवारी शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांना जाहीर झाली संजय देरकर हे पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीच्या...
*भव्य नामांकन रॅली* *कृ.उ.बा.स. परीसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर राजुरा.* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजुरा:-भारतीय...
वणी: वणी शहरातील स्वस्त, उत्तम गुणवत्ता आणि ग्राहकांची विश्वासाची पत जपणार एकमेव इलेक्ट्रॉनिक शॉप म्हणून ओळख निर्माण...
वणी : महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे येत्या 20 नोव्हेंबर ला विधानसभेची निवडणूक आहे आणि याच...
वणी : विधानसभा निवडणुकीची रनधुमाळी महाराष्ट्र राज्यात सध्या सुरु आहे. वणी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचा घटक पक्ष...
वण : विधानसभेची उमेदवारी भाजपचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांना जाहीर झाली बोदकुरवार हे पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या...
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हिंदू केंद्राचे उद्घाटन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते* ✍️दिनेश...
*राष्ट्रीय बजरंग दल(हिदुं केन्द्र) शाखेचे उद्घाटन* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी नागपूर:- उत्तर नागपुरात...
*आतंरराष्ट्रीय हिदुं परीषद/राष्ट्रीय बजंरग दल के और से "व्हॅलेंटाईन डे" का निषेध किया गया* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...