खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
*
*दि.१९ मार्च १९८६ बुधवार * *संभाजी ब्रिगेडचे एक दिवसीय अन्न त्याग आंदोलन.*
*दि.१९ मार्च १९८६ बुधवार * रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली ज्याची शासन दरबारी अधिकृत नोंद आहे ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावातील सामाजिक व संत विचारांचे शेतकरी स्मृतीशेष साहेबराव पाटील करपे यांनी त्या दिवशी आपली पत्नी व चार लेकरांसह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर कुष्ठधामात सामुहिक आत्महत्या केली. शासनाची शेतकरीविरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात झालेली विदारक अवस्था हेच त्या सामुहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. तेव्हापासून आजतागायत शेतकरी आत्महत्यांची मालिका देशभरात सुरुच आहे. ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागील काही वर्षात चुकीच्या सरकारी धोरणामुळे आपले आयुष्य संपविले आहे. शेतीसोबत निगडीत असलेल्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करणे हे प्रत्येक संवेदनशील व विचारी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आदी नरभक्षक कायद्यांचा विरोध करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने १९ मार्चला राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.
एक दिवस आम्ही उपवास केल्याने सरकार नावाच्या कठोर व मुर्दाड व्यवस्थेला काहीही फरक पडणार नाही. कोणीही आमदार,खासदार,मंत्री यांच्या संवेदना जागृत होणार नाही याची आम्हा सर्वांना कल्पना आहे. तरीसुद्धा आम्ही उपवास करतोय, कारण शेतकऱ्यांच्या वेदनेशी जोडून घेण्याचा आणि त्याच्या संकटात सोबत राहण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले उपाय फक्त सैध्दांतिक असून चालणार नाही तर ते व्यवहारात सुध्दा उतरले पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकात वैद्य,प्रा.दिलीप चौधरी सर.नेते संभाजी ब्रिगेड,चंद्रशेखर झाडे जिल्हाध्यक्ष,प्रा.डाॅ.सचिन बोधाने जिल्हा कार्याध्यक्ष,प्रमोद वाभिटकर जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी प्रमुख सदमाताई कुरेकर, राकेश भारती जिल्हा उपाध्यक्ष, संतोष भोयर कोषाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक दिलीप होरे, सुधाकर खरवडे, जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा सचिव प्रितामाताई परकारे, जिल्हा प्रवक्ता अर्चनाताई चौधरी, माजी अध्यक्ष लताताई होरे, प्रतिभा ताई भोयर, संभाजी ब्रिगेड चे पंकज चटप, गोमदेव थेरे, विजय बोरकर, मंगेश चटकी, प्रविण ढाकणे, कवडू काळे, संजय बोटरे, तसेच संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. व त्यातून शेतीव्यवसायात झालेली विदारक अवस्था हेच त्या सामुहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. तेव्हापासून आजतागायत शेतकरी आत्महत्यांची मालिका देशभरात सुरुच आहे. ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागील काही वर्षात चुकीच्या सरकारी धोरणामुळे आपले आयुष्य संपविले आहे. शेतीसोबत निगडीत असलेल्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करणे हे प्रत्येक संवेदनशील व विचारी माणसाचे कर्तव्य आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी, शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग), आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा आदी नरभक्षक कायद्यांचा विरोध करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने १९ मार्चला राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले जात आहे.
एक दिवस आम्ही उपवास केल्याने सरकार नावाच्या कठोर व मुर्दाड व्यवस्थेला काहीही फरक पडणार नाही. कोणीही आमदार,खासदार,मंत्री यांच्या संवेदना जागृत होणार नाही याची आम्हा सर्वांना कल्पना आहे. तरीसुद्धा आम्ही उपवास करतोय, कारण शेतकऱ्यांच्या वेदनेशी जोडून घेण्याचा आणि त्याच्या संकटात सोबत राहण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केलेले उपाय फक्त सैध्दांतिक असून चालणार नाही तर ते व्यवहारात सुध्दा उतरले पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे.
या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकात वैद्य,प्रा.दिलीप चौधरी सर.नेते संभाजी ब्रिगेड,चंद्रशेखर झाडे जिल्हाध्यक्ष,प्रा.डाॅ.सचिन बोधाने जिल्हा कार्याध्यक्ष,प्रमोद वाभिटकर जिल्हा कार्याध्यक्ष, संभाजी ब्रिगेडच्या महिला आघाडी प्रमुख सदमाताई कुरेकर, राकेश भारती जिल्हा उपाध्यक्ष, संतोष भोयर कोषाध्यक्ष, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक दिलीप होरे, सुधाकर खरवडे, जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा सचिव प्रितामाताई परकारे, जिल्हा प्रवक्ता अर्चनाताई चौधरी, माजी अध्यक्ष लताताई होरे, प्रतिभा ताई भोयर, संभाजी ब्रिगेड चे पंकज चटप, गोमदेव थेरे, विजय बोरकर, मंगेश चटकी, प्रविण ढाकणे, कवडू काळे, संजय बोटरे, तसेच संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
*चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक कंपन्यांमुळे होणारे प्रदूषण कमी करून संबंधित अधिकारी व कंपन्यांवर कार्यवाही करावी...
*निधन वार्ता* वार्ता राजू गोरे चंद्रपूर प्रतिनिधी - चिकणी नजीक शेगांव (खुर्द ) ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील पंचक्रोशीत...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...